शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

आंदोलनांमधून राज्यकर्त्यांची झोप उडवून देऊ..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 23:51 IST

सांगली : देशातील प्रत्येक व्यक्तीला आपल्या धर्माचा सार्थ अभिमान आहे. आपल्या देशात अनेक धर्म आहेत. त्यांना लोकशाही मार्गाने मान्यता मिळाली आहे. परंतु प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेल्या लिंगायत धर्माला मान्यता नाही. ती प्रदान न केल्यास राज्यकर्त्यांची झोप उडवू, प्रसंगी दिल्लीपर्यंत धडक मारली जाईल, असा इशारा लिंगायत समाजातील मुलींनी दिला.विश्रामबाग चौकात मोर्चेकरी ...

सांगली : देशातील प्रत्येक व्यक्तीला आपल्या धर्माचा सार्थ अभिमान आहे. आपल्या देशात अनेक धर्म आहेत. त्यांना लोकशाही मार्गाने मान्यता मिळाली आहे. परंतु प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेल्या लिंगायत धर्माला मान्यता नाही. ती प्रदान न केल्यास राज्यकर्त्यांची झोप उडवू, प्रसंगी दिल्लीपर्यंत धडक मारली जाईल, असा इशारा लिंगायत समाजातील मुलींनी दिला.विश्रामबाग चौकात मोर्चेकरी जमल्यानंतर व्यासपीठावर समाजातील मान्यवरांची व काही मोजक्याच मुलींची भाषणे झाली. मुलींची भाषणे प्रभावी झाल्यानंतर समाजबांधवांनी टाळ्या व शिट्ट्यांनी दाद दिली. आस्था महेश चौगुले (मिरज), समृद्धी सुरेश केरीपाळे (सांगली), सिद्धी संतोष पट्टणशेट्टी (जत), रसिका किरण बोडके (तासगाव), कृतिका गाडीवान (नांदेड) व प्रियांका महाजन (सांगली) या मुलींची भाषणे झाली.आस्था चौगुले म्हणाली, स्वातंत्र्यपूर्व काळात आमच्या धर्माला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता होती; पण देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ती मान्यता काढून घेण्यात आली. म्हणजे जेव्हा देश पारतंत्र्यात होता, तेव्हा लिंगायत धर्म स्वतंत्र होता आणि देशाच्या स्वातंत्र्यानंतर तो पारतंत्र्यात गेला. लोकशाही पद्धतीने आम्ही आमच्या मागण्या व हक्क मांडत आहे. शासनाने याकडे दुर्लक्ष करू नये. आम्हाला स्वतंत्र लिंगायत धर्माची मान्यता द्यावी.समृद्धी केरीपाळे म्हणाली, महात्मा बसवेश्वरांच्या शिकवणीत वाढलेले आम्ही लिंगायत जोपर्यंत शांत आहे, तोपर्यंत शांत आहे, पण असा अथांग महासागररूपी लिंगायत समाज जर खवळला, तर काय होईल. आमचा धर्म आम्हाला मिळाल्याशिवाय हा वाद शमणार नाही. आम्हाला खुर्ची नको, राजकारण नको, खासदारकी नको...आम्हाला हवा आहे फक्त आमचा हक्क आणि स्वतंत्र लिंगायत धर्माची शासनमान्यता.रसिका बोडके म्हणाली, लिंगायत धर्माला कोठेही सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रात मान-सन्मान नाही. समाज पिचला आहे. आजपर्यंत हा समाज उपेक्षितच राहिला आहे. आम्ही फक्त आमची ओळख व आमचा हक्क मागत आहोत. शासनदरबारी आमच्या धर्माची स्वतंत्र धर्म म्हणून नोंद करावीनांदेडच्या कृतिकाचे तडाखेबाज भाषणनांदेडच्या कृतिका गाडीवान हिचे तडाखेबाज भाषण झाले. लिंगायत धर्ममान्यतेच्या मागणीकडे दुर्लक्ष केले, तर लिंगायत समाज स्वस्थ बसणार नाही. प्रसंगी राज्यकर्त्यांची झोप उडवून देईल, असे कृतिकाने म्हणताच टाळ्यांचा कडकडाट झाला. आमच्या न्याय्य हक्कांसाठी हा लढा उभा केला आहे. लवकरच मुंबईतही मोर्चा काढणार आहोत. त्यानंतर आम्ही दिल्लीत धडक मारण्यास मागे-पुढे पाहणार नाही, असा इशाराही कृतिकाने दिला. राष्टÑसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी तिचा सत्कार केला.भीक नव्हे, हक्क द्या : सिद्धी पट्टणशेट्टीसिद्धी पट्टणशेट्टी म्हणाली, लिंगायत धर्म नेहमी देशाच्या आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रामध्ये प्रगती करीत आहे. आज जगामध्ये आमच्या लिंगायत धर्मानंतर स्थापन झालेल्या धर्माची ओळख आहे. पण नऊशे वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या आमच्या धर्माची ओळख नाहीशी होत आहे. स्वतंत्र धर्ममान्यतेसाठी भीक मागत नसून, आम्ही आमचा हक्क मागत आहोत. प्रियांका महाजन, निशांत मगदूम यांचीही भाषणे झाली.